0

नागरिकांनी घ्यावा लाभ
सर्व राष्ट्रीय बैकैत सेवा

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना हा दोन लाखांचा तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हादेखील दोन लाखांचा अपघाती विमा अशा एकूण चार लाखांच्या योजना केवळ ३४२ रुपयांत सामान्य नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. मंगळवारपासून या योजनेला प्रारंभ होणार आहे. त्यासाठी २५ मेपर्यंत अर्ज उपलब्ध राहणार आहेत. सामान्य नागरिकांना जून २०१५ ते ३१ मे २०१६ पर्यंत या दोन्ही योजनांमुळे चार लाखांच्या विम्याचे कवच मिळणार आहे.

सर्वसामान्यांचे आयुष्य विमा सुरक्षेच्या कक्षेत यावे यासाठी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन नवीन योजनांची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. त्यानुसार आता या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून, आज पासून बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रांमध्ये अर्ज उपलब्ध होणार आहेत. त्यात प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना हा दोन लाखांचा नैसर्गिक मृत्यूसाठी असून, तो १८ ते ५० वयोगटातील नागरिकांसाठी तो असेल.

केवळ ३३० रुपयांत हा विमा उतरवता येणार आहे. तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हा दाेन लाखांचा विमा अपघातात दुखापतीसाठी तसेच अपंगत्वासाठी लागू असणार आहे. हा विमा केवळ १२ रुपयांत वर्षभरासाठी उपलब्ध असेल. १८ ते ७० वयोगटातील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे सामान्य नागरिकांनी ३४२ रुपये भरल्यास त्यांना चार लाखांचे विमा कवच प्राप्त होणार आहे. सर्व बँकेच्या सर्वच शाखांमध्ये यासाठी अर्ज उपलब्ध राहणार असून, ग्राहक सेवा केंद्रात सदर रकमेची पावती भरून दिल्यासही हा विमा खातेधारकांना काढता येईल.

नागरिकांनी घ्यावा लाभ

केंद्र सरकारने सुरू केलेल्या या दोन विमा योजना सर्वसामान्यांसाठी महत्त्वपूर्ण असून देशतील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी आज पासून बँकेच्या सर्वच शाखांमध्ये अर्ज उपलब्ध होणार आहेत. केवळ १२ आणि ३३० रुपयांत एकूण चार लाखांचा विमा मिळणार असल्याने नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

केंद्रशासनाच्या दोन नवीन योजना सुरु... वार्षिक हप्ता रुपये ३४२/- मध्ये ४ लाख रुपयाचे विमा संरक्षण.. केंद्र शासनाने दोन नवीन योजना सुरु केल्या आहेत...
१) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
रुपये ३३० वार्षिक हप्ता
लाभार्थी वयोगट १८ ते ५०
लाभ - मृत्यू झाल्यास २ लाख रुपये भरपाई
अट - फक्त बँकेत खाते असणे आवश्यक कोणीही लाभ घेवू शकतो

२) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

रुपये १२ वार्षिक हप्ता
लाभार्थी वयोगट १८ ते ७०
लाभ - जखमी झाल्यास १ लाख रुपये व मृत्यू झाल्यास २ लाख रुपये भरपाई
अट - फक्त बँकेत खाते असणे आवश्यक कोणीही लाभ घेवू शकतो
दोन्ही योजनेचा लाभ तुम्ही एकत्रित रित्या घेवून रुपये ३४२ च्या वार्षिक हप्त्यामध्ये ४ लाख रुपयांचे संरक्षण मिळवू शकता. लवकरात लवकर तुमच्या बँकेशी संपर्क साधा..

Post a Comment

 
Top